[ad_1]
पुणेः देशात यंदा तूर उत्पादन घटले. मात्र सरकारच्या आयात धोरणामुळे दर दबावात आहेत. असं असलं तरी हमीभाव खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. राज्यात आत्तापर्यंत केवळ ७८० टन तुरीची हमीभावाने खरेदी झाली. तर कर्नाटकात सर्वाधिक १० हजार १७७ टन तूर शेतकऱ्यांनी हमीभावाने विकली.
देशात केंद्र सरकारने यंदा देशात ४० लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र यंदा तूर उत्पादन(Tur production) ३० ते ३३ लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. सरकारने तूर आयात मुक्त श्रेणीत ठेवली आहे. परिणामी देशात चालू वित्तीय वर्षांत आत्तापर्यंत ६ लाख टनांच्या दरम्यान तूर आयात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आणखी तीन महिने बाकी आहेत. मागील वर्षी देशात ४.४२ लाख टन तूर आयात(Import) झाली होती, तर २०१९-२० मध्ये ४.५ लाख टन तूर देशात दाखल झाली होती. म्हणजेच सरकारने यंदा विक्रमी तूर आयात केली. परिणामी सध्या तुरीचे दर दबावात आहेत. उत्पादनात घट झाल्यानं तुरीचे दर वाढायला हवे होते. मात्र सरकारच्या(government) धोरणाने दरवाढीला खीळ बसली.
सरकार यंदा ११ लाख टनांच्या दरम्यानच तूर हमीभावाने खेरदी करणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना उरलेली तूर खुल्या बाजारात विकावी लागेल. मात्र सध्या खुल्या बाजारात सर्वसाधरण दर हमीभावाच्या खालीच आहे. यंदा सरकारने तुरीला ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहिर केला. देशातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकसह महत्वाच्या राज्यांत तूर खरेदी सुरुही झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना अधिक दराची अपेक्षा असल्याने हमीभाव खरेदीलाही कमी प्रतिसाद मिळत आहे.
हे हि पहा :
देशाता आत्तापर्यंत कर्नाटकात सर्वाधिक १० हजार १७७ टन तुरीची हमीभावाने खेरदी झाली. कर्नाटक तूर उत्पादनात अग्रेसर आहे. कर्नाटक सरकारने यंदा १२ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्ते केला आहे. तर जाणकारांच्या मते येथे ९ लाख टनच उत्पादन होईल. कर्नाटकनंतर गुजरातमध्ये दीड हजार टन खरेदी झाली. तसे पाहिल्यास महाराष्ट्र तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर येतो. यंदा महाराष्ट्र सरकारने १० लाख ८४ हजार टन तूर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु आत्तापर्यंत केवळ ७८० टन तुरीची हमीभावाने खरेदी झाली आहे. तर तमिळनाडूत फक्त २ टन तूर हमीभावाने खरेदी झाली.
शेतकऱ्यांनी चालू हंगामात सोयाबीन आणि कापसाची टप्प्याटप्याने विक्री केली. परिणामी बाजारात दर टिकून राहिले. हा अनुभव पाठिशी असल्याने शेतकरी तुरीची लगेच विक्री करताना दिसत नाहीत, असं लातूर येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात तुरीला सर्वसाधारण ६ हजार ते ६ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. बहुतांश बाजार समित्यांत दर अद्यापही हमीभावाच्या खालीच आहेत. त्यामुळे शेतकरी लगेच माल विकत नाहीत. तसेच भविष्यात दरात तेजी येईल, या अपेक्षेनेही शेतकऱ्यांची विक्री कमी आहे, असं जाणकारांनी सांगितलं.
…..
राज्यनिहाय तूर खरेदी (टनांत)
कर्नाटकः १०,१७७
गुजरातः १४५२
महाराष्ट्रः ७८०
तमिळनाडूः २
पुणेः देशात यंदा तूर उत्पादन घटले. मात्र सरकारच्या आयात धोरणामुळे दर दबावात आहेत. असं असलं तरी हमीभाव खरेदी केंद्रांकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली. राज्यात आत्तापर्यंत केवळ ७८० टन तुरीची हमीभावाने खरेदी झाली. तर कर्नाटकात सर्वाधिक १० हजार १७७ टन तूर शेतकऱ्यांनी हमीभावाने विकली.
देशात केंद्र सरकारने यंदा देशात ४० लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्त केला. मात्र यंदा तूर उत्पादन(Tur production) ३० ते ३३ लाख टनांच्या दरम्यान राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला. सरकारने तूर आयात मुक्त श्रेणीत ठेवली आहे. परिणामी देशात चालू वित्तीय वर्षांत आत्तापर्यंत ६ लाख टनांच्या दरम्यान तूर आयात झाल्याचे सूत्रांनी सांगितले. आणखी तीन महिने बाकी आहेत. मागील वर्षी देशात ४.४२ लाख टन तूर आयात(Import) झाली होती, तर २०१९-२० मध्ये ४.५ लाख टन तूर देशात दाखल झाली होती. म्हणजेच सरकारने यंदा विक्रमी तूर आयात केली. परिणामी सध्या तुरीचे दर दबावात आहेत. उत्पादनात घट झाल्यानं तुरीचे दर वाढायला हवे होते. मात्र सरकारच्या(government) धोरणाने दरवाढीला खीळ बसली.
सरकार यंदा ११ लाख टनांच्या दरम्यानच तूर हमीभावाने खेरदी करणार आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना उरलेली तूर खुल्या बाजारात विकावी लागेल. मात्र सध्या खुल्या बाजारात सर्वसाधरण दर हमीभावाच्या खालीच आहे. यंदा सरकारने तुरीला ६ हजार ३०० रुपये हमीभाव जाहिर केला. देशातील गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटकसह महत्वाच्या राज्यांत तूर खरेदी सुरुही झाली आहे. मात्र शेतकऱ्यांना अधिक दराची अपेक्षा असल्याने हमीभाव खरेदीलाही कमी प्रतिसाद मिळत आहे.
हे हि पहा :
देशाता आत्तापर्यंत कर्नाटकात सर्वाधिक १० हजार १७७ टन तुरीची हमीभावाने खेरदी झाली. कर्नाटक तूर उत्पादनात अग्रेसर आहे. कर्नाटक सरकारने यंदा १२ लाख टन तूर उत्पादनाचा अंदाज व्यक्ते केला आहे. तर जाणकारांच्या मते येथे ९ लाख टनच उत्पादन होईल. कर्नाटकनंतर गुजरातमध्ये दीड हजार टन खरेदी झाली. तसे पाहिल्यास महाराष्ट्र तूर उत्पादनात दुसऱ्या क्रमांकावर येतो. यंदा महाराष्ट्र सरकारने १० लाख ८४ हजार टन तूर उत्पादन होईल, असा अंदाज व्यक्त केला आहे. परंतु आत्तापर्यंत केवळ ७८० टन तुरीची हमीभावाने खरेदी झाली आहे. तर तमिळनाडूत फक्त २ टन तूर हमीभावाने खरेदी झाली.
शेतकऱ्यांनी चालू हंगामात सोयाबीन आणि कापसाची टप्प्याटप्याने विक्री केली. परिणामी बाजारात दर टिकून राहिले. हा अनुभव पाठिशी असल्याने शेतकरी तुरीची लगेच विक्री करताना दिसत नाहीत, असं लातूर येथील व्यापाऱ्यांनी सांगितले. सध्या बाजारात तुरीला सर्वसाधारण ६ हजार ते ६ हजार ३०० रुपये दर मिळत आहे. बहुतांश बाजार समित्यांत दर अद्यापही हमीभावाच्या खालीच आहेत. त्यामुळे शेतकरी लगेच माल विकत नाहीत. तसेच भविष्यात दरात तेजी येईल, या अपेक्षेनेही शेतकऱ्यांची विक्री कमी आहे, असं जाणकारांनी सांगितलं.
…..
राज्यनिहाय तूर खरेदी (टनांत)
कर्नाटकः १०,१७७
गुजरातः १४५२
महाराष्ट्रः ७८०
तमिळनाडूः २
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.