[ad_1]
सातारा ः जिल्ह्यातील दुष्काळी खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, माण तालुक्यासह कऱ्हाड, सातारा, जावली, पाटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यांना रविवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेते पाणी भरून वाहिली असून उसासह अनेक फळपिके, भाजीपाला पिके आडवी झाल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २४ सरासरी ३४.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी बहुतांशी ठिकाणी कडक ऊन पडले होते. दुपार वातावरण गरमी वाढत गेली व रात्री जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. वादळी वारे, विजेच्या गर्जनासह सुमारे दोन तासांपेक्षा अधिक पाऊस सुरू होता. काही ठिकाणी रातभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या. वादळामुळे अनेक ठिकाणची वीज खंडीत झाली असून पिके भुईसपाट झाली आहेत.
दुष्काळी खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा व माण तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला आहे. या तालुक्यातील फळपिके, चाऱ्यांची पिके तसेच ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पश्चिमेकडील कराड, पाटण, सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. दोन तासांहून अधिक काळ जोरदार पाऊस सुरू होता.
यामुळे अनेक ठिकाणीची शेते पाण्याने तुंडुब भरून वाहू लागली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेली बांधबंदिस्ती वाहून गेली आहे. वाऱ्यामुळे उसाचे पिके आडवे झाले असून भाजीपाला पिके खराब होऊ लागली आहे. पोटऱ्यांत आलेला भात आडाव झाल्याने नुकसान होणार आहे. पहिल्या टप्यात झालेल्या पेरणीची पिका हा पाऊस नुकसानकारक ठरणार असलातरी उशिरा पेरा झालेल्या पिकांना तसेच रब्बी हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
सातारा-३४.९८. जावली-२२.३०, पाटण- २४.७३, कऱ्हाड- ५१.२३, कोरेगाव-२३.४६, खटाव-५०.११, माण-५.००, फलटण-४५.७८, खंडाळा-२६.८०, वाई-४७.८६, महाबळेश्वर- १९.२५.
सातारा ः जिल्ह्यातील दुष्काळी खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा, माण तालुक्यासह कऱ्हाड, सातारा, जावली, पाटण, वाई, महाबळेश्वर तालुक्यांना रविवारी पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी शेते पाणी भरून वाहिली असून उसासह अनेक फळपिके, भाजीपाला पिके आडवी झाल्याने नुकसान झाले आहे. जिल्ह्यात २४ सरासरी ३४.२९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात रविवारी बहुतांशी ठिकाणी कडक ऊन पडले होते. दुपार वातावरण गरमी वाढत गेली व रात्री जिल्ह्यातील बहुतांशी ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसास सुरुवात झाली. वादळी वारे, विजेच्या गर्जनासह सुमारे दोन तासांपेक्षा अधिक पाऊस सुरू होता. काही ठिकाणी रातभर थांबून थांबून पावसाच्या सरी कोसळत होत्या. वादळामुळे अनेक ठिकाणची वीज खंडीत झाली असून पिके भुईसपाट झाली आहेत.
दुष्काळी खटाव, फलटण, कोरेगाव, खंडाळा व माण तालुक्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस झाला आहे. या तालुक्यातील फळपिके, चाऱ्यांची पिके तसेच ऊस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच पश्चिमेकडील कराड, पाटण, सातारा, वाई, जावली, महाबळेश्वर तालुक्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस झाला आहे. दोन तासांहून अधिक काळ जोरदार पाऊस सुरू होता.
यामुळे अनेक ठिकाणीची शेते पाण्याने तुंडुब भरून वाहू लागली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांनी केलेली बांधबंदिस्ती वाहून गेली आहे. वाऱ्यामुळे उसाचे पिके आडवे झाले असून भाजीपाला पिके खराब होऊ लागली आहे. पोटऱ्यांत आलेला भात आडाव झाल्याने नुकसान होणार आहे. पहिल्या टप्यात झालेल्या पेरणीची पिका हा पाऊस नुकसानकारक ठरणार असलातरी उशिरा पेरा झालेल्या पिकांना तसेच रब्बी हंगामाच्या दृष्टीने हा पाऊस फायदेशीर ठरणार आहे.
तालुकानिहाय पाऊस मिलिमीटरमध्ये
सातारा-३४.९८. जावली-२२.३०, पाटण- २४.७३, कऱ्हाड- ५१.२३, कोरेगाव-२३.४६, खटाव-५०.११, माण-५.००, फलटण-४५.७८, खंडाळा-२६.८०, वाई-४७.८६, महाबळेश्वर- १९.२५.
[ad_2]
Source link