[ad_1]
कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची जबाबदारी संबंधित कारखान्यांवर सोपवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सचिव राजेंद्र तावरे पाटील यांनी केली आहे. या बाबतचे पत्र त्यांनी साखर आयुक्तांना पाठवले आहे.
राज्यातील साखर कामगारांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत चालेले आहे. प्रत्येक साखर कारखान्यात पंधरा ते वीस साखर कामगार व त्यांच्या संसर्गाने त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोनामुळे आजारी पडलेले दिसतात. काही कारखान्यावर तर कोरोनाने गंभीर आजारी पडून साखर कामगार निधन पावल्याचे सुद्धा दिसून आले आहे.
पण दुसऱ्या बाजूला राज्यातील साखर कारखाने पंधरा ऑक्टोबरला चालू करण्याची प्रत्येक कारखान्यावर घाई चालू झालेली आहे. त्यामुळे साखर कामगारांना कामावर यावेच लागत आहे. त्यासाठी ले ऑफ देऊन पगारी सुट्ट्या वगैरे इतर कोणत्याही तरतुदी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने केलेल्या दिसून येत नाहीत. कोरोनाचे संकट साखर कामगारांवर वाढतच चालले आहे. कारखान्यांच्या व्यवस्थापनाचे मात्र याकडे लक्ष नाही त्यांचा हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने कामगारांवर रोज दबाव वाढतानाच दिसून येत आहे.
साखर कामगार कोरोनाने आजारी पडला किंवा त्यांच्या सहवासाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाने आजारी पडले तर त्यांच्या सर्व कुटुंबाच्या दवाखान्याची आर्थिक खर्चाची जबाबदारी कारखान्यांना द्यावी. या काळात घरातील सदस्यामुळे किंवा स्वतः आजारी पडल्याने क्वारंटाइन-विलीनीकरण व्हावे लागले तर त्या कामगाराला त्या काळातील संपूर्ण दिवसांची पगारी रजा देण्यात यावी.
कारखान्यात कामावर असलेल्या कोणत्याही मग तो कायम कामगार, हंगामी किंवा रोजंदारी, कंत्राटी, बदली, सिव्हिल कामगार व त्यांचे कुटुंबातील सदस्यांचे साखर कामगाराच्या सहवासानेच संसर्ग होऊन कोरोना झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्यास कामगाराला व त्यांच्या कुटुंबास त्या-त्या साखर कारखान्याकडून रुपये दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आलेली आहे.
कोल्हापूर : राज्यातील साखर कामगारांची आरोग्याची जबाबदारी संबंधित कारखान्यांवर सोपवावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे सचिव राजेंद्र तावरे पाटील यांनी केली आहे. या बाबतचे पत्र त्यांनी साखर आयुक्तांना पाठवले आहे.
राज्यातील साखर कामगारांचे कोरोना पॉझिटिव्ह होण्याचे प्रमाण प्रचंड वाढत चालेले आहे. प्रत्येक साखर कारखान्यात पंधरा ते वीस साखर कामगार व त्यांच्या संसर्गाने त्यांच्या कुटुंबातील काही सदस्य कोरोनामुळे आजारी पडलेले दिसतात. काही कारखान्यावर तर कोरोनाने गंभीर आजारी पडून साखर कामगार निधन पावल्याचे सुद्धा दिसून आले आहे.
पण दुसऱ्या बाजूला राज्यातील साखर कारखाने पंधरा ऑक्टोबरला चालू करण्याची प्रत्येक कारखान्यावर घाई चालू झालेली आहे. त्यामुळे साखर कामगारांना कामावर यावेच लागत आहे. त्यासाठी ले ऑफ देऊन पगारी सुट्ट्या वगैरे इतर कोणत्याही तरतुदी साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने केलेल्या दिसून येत नाहीत. कोरोनाचे संकट साखर कामगारांवर वाढतच चालले आहे. कारखान्यांच्या व्यवस्थापनाचे मात्र याकडे लक्ष नाही त्यांचा हंगाम चालू करण्याच्या दृष्टीने कामगारांवर रोज दबाव वाढतानाच दिसून येत आहे.
साखर कामगार कोरोनाने आजारी पडला किंवा त्यांच्या सहवासाने त्यांच्या कुटुंबातील सदस्य कोरोनाने आजारी पडले तर त्यांच्या सर्व कुटुंबाच्या दवाखान्याची आर्थिक खर्चाची जबाबदारी कारखान्यांना द्यावी. या काळात घरातील सदस्यामुळे किंवा स्वतः आजारी पडल्याने क्वारंटाइन-विलीनीकरण व्हावे लागले तर त्या कामगाराला त्या काळातील संपूर्ण दिवसांची पगारी रजा देण्यात यावी.
कारखान्यात कामावर असलेल्या कोणत्याही मग तो कायम कामगार, हंगामी किंवा रोजंदारी, कंत्राटी, बदली, सिव्हिल कामगार व त्यांचे कुटुंबातील सदस्यांचे साखर कामगाराच्या सहवासानेच संसर्ग होऊन कोरोना झाल्यामुळे त्यांचे निधन झाल्यास कामगाराला व त्यांच्या कुटुंबास त्या-त्या साखर कारखान्याकडून रुपये दहा लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी पत्रात करण्यात आलेली आहे.
[ad_2]
Source link