[ad_1]
सांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री सुरू झाली आहे. परंतु द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल झाले नाहीत. त्यामुळे हंगामाला गती येण्यास अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही भागांत आगाप छाटणी केलेल्या द्राक्षाची विक्री झाली होती. त्यानंतर फारशी खरेदी सुरू झाली नाही. द्राक्ष पिकास पोषक वातावरण असल्याने द्राक्षाची गोडी आणि वाढ चांगली होण्यास मदत होऊ लागली आहे. वास्तविक पाहता दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष बाजारपेठेत विक्रीस येतात. जानेवारी महिन्याच्या मध्यावर देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतात. हळूहळू हंगामास गती येते.
यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाचे विघ्न आले होते. त्यामुळे एकाच वेळी फळछाटणी झाल्याने एकाच वेळी द्राक्षाची काढणी सुरू होण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तुरळक ठिकाणी द्राक्ष विक्री सुरु झाली आहे. परंतु जानेवारी महिन्याचा मध्य झाला तरी, व्यापारी दाखल झाले नाहीत.
काही ठिकाणी व्यापारी दाखल झाले असले, तरी द्राक्षाची गोडी नसल्याने काढणीला सुरुवात केली नाही. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होईल, आणि फेब्रुवारीच्या मध्यावर गती येईल, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे.
प्रतिक्रिया
यंदा द्राक्षाच्या हंगामाला प्रारंभापासून फटका बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करून बागा उत्तमरीत्या जोपासल्या आहेत. एकाच वेळी छाटणी झाल्याने हंगाम उशिरा सुरू होईल.
– सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ
सांगली ः जिल्ह्यात अगदी क्वचितच आगाप छाटणी घेतलेल्या द्राक्षाची विक्री सुरू झाली आहे. परंतु द्राक्ष खरेदीसाठी व्यापारी दाखल झाले नाहीत. त्यामुळे हंगामाला गती येण्यास अजून पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी मिरज आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील काही भागांत आगाप छाटणी केलेल्या द्राक्षाची विक्री झाली होती. त्यानंतर फारशी खरेदी सुरू झाली नाही. द्राक्ष पिकास पोषक वातावरण असल्याने द्राक्षाची गोडी आणि वाढ चांगली होण्यास मदत होऊ लागली आहे. वास्तविक पाहता दरवर्षी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात द्राक्ष बाजारपेठेत विक्रीस येतात. जानेवारी महिन्याच्या मध्यावर देशभरातील व्यापारी सांगलीत दाखल होतात. हळूहळू हंगामास गती येते.
यंदा हंगामाच्या प्रारंभापासूनच पावसाचे विघ्न आले होते. त्यामुळे एकाच वेळी फळछाटणी झाल्याने एकाच वेळी द्राक्षाची काढणी सुरू होण्याची शक्यता द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. गेल्या पंधरा दिवसांपासून तुरळक ठिकाणी द्राक्ष विक्री सुरु झाली आहे. परंतु जानेवारी महिन्याचा मध्य झाला तरी, व्यापारी दाखल झाले नाहीत.
काही ठिकाणी व्यापारी दाखल झाले असले, तरी द्राक्षाची गोडी नसल्याने काढणीला सुरुवात केली नाही. त्यामुळे यंदाचा द्राक्ष हंगाम फेब्रुवारीच्या सुरुवातीपासून सुरू होईल, आणि फेब्रुवारीच्या मध्यावर गती येईल, असा अंदाज द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी व्यक्त केलेला आहे.
प्रतिक्रिया
यंदा द्राक्षाच्या हंगामाला प्रारंभापासून फटका बसला आहे. त्यातून शेतकऱ्यांनी काटेकोर नियोजन करून बागा उत्तमरीत्या जोपासल्या आहेत. एकाच वेळी छाटणी झाल्याने हंगाम उशिरा सुरू होईल.
– सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ
[ad_2]
Source link