[ad_1]
सीताफळ लागवड दोन वेगवेगळ्या क्षेत्रात असून त्यात १५ वर्षाची ४०० आणि २ वर्षे वयाची ४०० झाडे आहेत. सध्या फक्त १५ वर्षे झालेल्या बागेतील झाडांपासून उत्पादन घेत आहे. दुसऱ्या बागेतील उत्पादन पुढील वर्षी सुरू होईल. बहार धरण्यापूर्वी बागेत करावयाच्या सर्व कामांचे पूर्वनियोजन केले जाते. त्यानुसार कामांची आखणी केली जाते.
शेतकरी : लक्ष्मण संभाजी झेंडे
गाव : दिवे, ता पुरंदर, पुणे
एकूण क्षेत्र :८ एकर
सीताफळ क्षेत्र : ४ एकर (८०० झाडे)
पुरंदर तालुक्यातील दिवे येथे आमची एकत्रित कुटुंबाची ८ एकर शेती आहे. त्यापैकी चार एकरमध्ये सीताफळ लागवड आणि एक एकरावर अंजीर बाग आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये वाटाणा, कांदा, गाजर, पालक, टोमॅटो आणि ज्वारी या पिकांची लागवड आहे.
सीताफळ लागवड दोन वेगवेगळ्या क्षेत्रात असून त्यात १५ वर्षाची ४०० आणि २ वर्षे वयाची ४०० झाडे आहेत. सध्या फक्त १५ वर्षे झालेल्या बागेतील झाडांपासून उत्पादन घेत आहे. दुसऱ्या बागेतील उत्पादन पुढील वर्षी सुरू होईल. बहार धरण्यापूर्वी बागेत करावयाच्या सर्व कामांचे पूर्वनियोजन केले जाते. त्यानुसार कामांची आखणी केली जाते.
सीताफळ हे कमी पाण्यावर येणारे आणि हमखास चांगले उत्पादन मिळणारे फळझाड आहे. सीताफळ झाडांच्या व्यवस्थापनासाठी इतर फळपिकांच्या तुलनेत अत्यंत कमी उत्पादन खर्च येतो. त्यामुळे सीताफळ लागवड ही फायदेशीर ठरत असल्याचे माझा अनुभव आहे.
या वर्षीचे नियोजन
- मे महिन्यात बागेची छाटणी केली. झाडांच्या जुन्या, वाळलेल्या फांद्या, वाळलेली फळे काढून टाकली. त्यानंतर आंतरमशागतीची कामे करून झाडांना आळी तयार केली.
- सीताफळ झाडाचे खोडापासून काही अंतरावर शेणखत, निंबोळी पेंड दिले.
- जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी दिले जाते.
- सिताफळाला पालवी व कळी निघाल्यानंतर कळीला बुरशीजन्य व इतर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फवारणी केली.
- कळी लागल्यानंतर फळे काळी पडू नये, यासाठी दर १५ दिवसानंतर फवारणी केली.
- साधारण सप्टेंबर महिन्यापासून झाडांवर योग्य आकाराची फळे तयार होण्यास सुरुवात झाली.
सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणा
सिंचनासाठी विहिरीतील पाणी वापरले जाते. विहीर घरापासून २ किमी तर शेतापासून दीड किमी अंतरावर आहे. प्रत्येक वेळी सिंचनासाठी विहिरीवर जाऊन पंप चालू करायला लागायचा. रात्रीच्या वेळी तेथे जाऊन पंप चालू करणे धोकादायक वाटायचे. त्यासाठी विहिरीवरील पंपाला ॲटो स्टार्टर बसवून घेतला आहे. त्यामुळे घरातूनच मोबाईलद्वारे पंप चालू बंद करणे शक्य झाले आहे. सर्व लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे पाण्यामध्येही मोठी बचत होत आहे.
कमी खतांचा वापर
बागेस लेंडीखत किंवा शेणखत यांच्या उपलब्धतेनुसार वापर केला जातो. साधारणपणे एका झाडाला ३ ते ४ किलो लेंडीखत टाकले जाते. मात्र, लेंडी खत नसेल तर शेणखताचा वापर केला जातो. त्यामध्ये एका झाडाला ३ ते ४ किलो चांगले कुजलेले शेणखत टाकले जाते. त्यामुळे फळे चांगले येण्यास मदत होते. दरवर्षी बहार धरण्याच्या एक महिनाआधी ही मात्रा दिली जाते.
काढणी नियोजन
- फळे मोठ्या आकाराची आणि पक्व झाल्यानंतर तोडली जातात. बहार धरल्यानंतर साधारणपणे चार ते पाच महिन्यात फळ काढणीला येते. बाजारभावाची माहिती घेऊन मजुरांच्या मदतीने फळे काढणीचे नियोजन केले जाते. जेणेकरून चांगला दर मिळेल.
- फळांच्या आकारमानानुसार त्यांची प्रतवारी करून कॅरेटमध्ये भरली जातात.
विक्री नियोजन
- प्रतवारी केलेली सीताफळ क्रेट मुंबई, सासवड, पुणे बाजारसमितीमध्ये विक्रीसाठी पाठविली जातात. हंगामात प्रतिदिन साधारण ३० ते ३५ क्रेट विक्रीसाठी पाठविले जातात. एक क्रेट साधारण १८ ते २० किलो वजनाचा असतो.
- एकरी आठ ते दहा टन सीताफळ उत्पादन मिळते. त्यास प्रति किलो १० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळतो.
आगामी नियोजन
- बागेची छाटणी करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मशागत केली जाईल.
- उपलब्धतेनुसार लेंडीखत किंवा शेणखतांची प्रतिझाड मात्रा दिली जाईल.
- बहार धरताना पहिले पाणी पाटपाणी पद्धतीने पाणी दिले जाईल. आणि त्यानंतर ठिबक सिंचन पद्धतीने १५ दिवसांच्या अंतराने पाणी दिले जाईल.
- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेतील झाडांचे वेळोवेळी निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन केले जाईल.
– लक्ष्मण झेंडे, ९८५०२९३७१९
सीताफळ लागवड दोन वेगवेगळ्या क्षेत्रात असून त्यात १५ वर्षाची ४०० आणि २ वर्षे वयाची ४०० झाडे आहेत. सध्या फक्त १५ वर्षे झालेल्या बागेतील झाडांपासून उत्पादन घेत आहे. दुसऱ्या बागेतील उत्पादन पुढील वर्षी सुरू होईल. बहार धरण्यापूर्वी बागेत करावयाच्या सर्व कामांचे पूर्वनियोजन केले जाते. त्यानुसार कामांची आखणी केली जाते.
शेतकरी : लक्ष्मण संभाजी झेंडे
गाव : दिवे, ता पुरंदर, पुणे
एकूण क्षेत्र :८ एकर
सीताफळ क्षेत्र : ४ एकर (८०० झाडे)
पुरंदर तालुक्यातील दिवे येथे आमची एकत्रित कुटुंबाची ८ एकर शेती आहे. त्यापैकी चार एकरमध्ये सीताफळ लागवड आणि एक एकरावर अंजीर बाग आहे. उर्वरित क्षेत्रामध्ये वाटाणा, कांदा, गाजर, पालक, टोमॅटो आणि ज्वारी या पिकांची लागवड आहे.
सीताफळ लागवड दोन वेगवेगळ्या क्षेत्रात असून त्यात १५ वर्षाची ४०० आणि २ वर्षे वयाची ४०० झाडे आहेत. सध्या फक्त १५ वर्षे झालेल्या बागेतील झाडांपासून उत्पादन घेत आहे. दुसऱ्या बागेतील उत्पादन पुढील वर्षी सुरू होईल. बहार धरण्यापूर्वी बागेत करावयाच्या सर्व कामांचे पूर्वनियोजन केले जाते. त्यानुसार कामांची आखणी केली जाते.
सीताफळ हे कमी पाण्यावर येणारे आणि हमखास चांगले उत्पादन मिळणारे फळझाड आहे. सीताफळ झाडांच्या व्यवस्थापनासाठी इतर फळपिकांच्या तुलनेत अत्यंत कमी उत्पादन खर्च येतो. त्यामुळे सीताफळ लागवड ही फायदेशीर ठरत असल्याचे माझा अनुभव आहे.
या वर्षीचे नियोजन
- मे महिन्यात बागेची छाटणी केली. झाडांच्या जुन्या, वाळलेल्या फांद्या, वाळलेली फळे काढून टाकली. त्यानंतर आंतरमशागतीची कामे करून झाडांना आळी तयार केली.
- सीताफळ झाडाचे खोडापासून काही अंतरावर शेणखत, निंबोळी पेंड दिले.
- जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये गरजेप्रमाणे पाणी दिले जाते.
- सिताफळाला पालवी व कळी निघाल्यानंतर कळीला बुरशीजन्य व इतर रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून फवारणी केली.
- कळी लागल्यानंतर फळे काळी पडू नये, यासाठी दर १५ दिवसानंतर फवारणी केली.
- साधारण सप्टेंबर महिन्यापासून झाडांवर योग्य आकाराची फळे तयार होण्यास सुरुवात झाली.
सिंचनासाठी स्वयंचलित यंत्रणा
सिंचनासाठी विहिरीतील पाणी वापरले जाते. विहीर घरापासून २ किमी तर शेतापासून दीड किमी अंतरावर आहे. प्रत्येक वेळी सिंचनासाठी विहिरीवर जाऊन पंप चालू करायला लागायचा. रात्रीच्या वेळी तेथे जाऊन पंप चालू करणे धोकादायक वाटायचे. त्यासाठी विहिरीवरील पंपाला ॲटो स्टार्टर बसवून घेतला आहे. त्यामुळे घरातूनच मोबाईलद्वारे पंप चालू बंद करणे शक्य झाले आहे. सर्व लागवडीमध्ये ठिबक सिंचन पद्धतीचा अवलंब केला आहे. त्यामुळे पाण्यामध्येही मोठी बचत होत आहे.
कमी खतांचा वापर
बागेस लेंडीखत किंवा शेणखत यांच्या उपलब्धतेनुसार वापर केला जातो. साधारणपणे एका झाडाला ३ ते ४ किलो लेंडीखत टाकले जाते. मात्र, लेंडी खत नसेल तर शेणखताचा वापर केला जातो. त्यामध्ये एका झाडाला ३ ते ४ किलो चांगले कुजलेले शेणखत टाकले जाते. त्यामुळे फळे चांगले येण्यास मदत होते. दरवर्षी बहार धरण्याच्या एक महिनाआधी ही मात्रा दिली जाते.
काढणी नियोजन
- फळे मोठ्या आकाराची आणि पक्व झाल्यानंतर तोडली जातात. बहार धरल्यानंतर साधारणपणे चार ते पाच महिन्यात फळ काढणीला येते. बाजारभावाची माहिती घेऊन मजुरांच्या मदतीने फळे काढणीचे नियोजन केले जाते. जेणेकरून चांगला दर मिळेल.
- फळांच्या आकारमानानुसार त्यांची प्रतवारी करून कॅरेटमध्ये भरली जातात.
विक्री नियोजन
- प्रतवारी केलेली सीताफळ क्रेट मुंबई, सासवड, पुणे बाजारसमितीमध्ये विक्रीसाठी पाठविली जातात. हंगामात प्रतिदिन साधारण ३० ते ३५ क्रेट विक्रीसाठी पाठविले जातात. एक क्रेट साधारण १८ ते २० किलो वजनाचा असतो.
- एकरी आठ ते दहा टन सीताफळ उत्पादन मिळते. त्यास प्रति किलो १० ते १५० रुपयांपर्यंत दर मिळतो.
आगामी नियोजन
- बागेची छाटणी करण्याचे नियोजन आहे. त्यानंतर मशागत केली जाईल.
- उपलब्धतेनुसार लेंडीखत किंवा शेणखतांची प्रतिझाड मात्रा दिली जाईल.
- बहार धरताना पहिले पाणी पाटपाणी पद्धतीने पाणी दिले जाईल. आणि त्यानंतर ठिबक सिंचन पद्धतीने १५ दिवसांच्या अंतराने पाणी दिले जाईल.
- कीड-रोगांच्या प्रादुर्भावासाठी बागेतील झाडांचे वेळोवेळी निरिक्षण केले जाईल. आवश्यकतेनुसार फवारणीचे नियोजन केले जाईल.
– लक्ष्मण झेंडे, ९८५०२९३७१९
[ad_2]
Source link