[ad_1]
पुणे : छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होत आहे. यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
एप्रिल महिना उजाडून जवळपास पाच दिवस झाले आहेत. या काळात उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला आहे. येत्या चार ते पाच वातावरणात आणखी बदल होऊन उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊन कमाल तापमानाचा पारा अजून काहीसा वाढेल. विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट काही प्रमाणात राहणार असल्याने पुन्हा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत.
सोमवारी (ता. ५) सकाळी चोवीस तासांत अकोला येथे उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. महाबळेश्वर येथे १७.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तर उत्तर कर्नाटक ते तमिळनाडूच्या उत्तर -दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून तेलंगाणा ते उत्तर तमिळनाडू या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याने उन्हाचा चटका, वाढता उकाडा, उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस असे वातावरणात बदल होत
आहेत.
यामुळे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात व कोकण गोव्याच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
पुणे : छत्तीसगडच्या दक्षिण भाग व परिसरात चक्रीय वाऱ्याची स्थिती सक्रिय होत आहे. यामुळे विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यात शनिवारी (ता. १०) विजांच्या कडकडाट व मेघगर्जनेसह अवकाळी पाऊस पडण्याचा इशारा हवामान विभागाच्या सूत्रांनी दिला.
एप्रिल महिना उजाडून जवळपास पाच दिवस झाले आहेत. या काळात उन्हाचा पारा ४३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहिला आहे. येत्या चार ते पाच वातावरणात आणखी बदल होऊन उन्हाच्या झळा आणखी तीव्र होऊन कमाल तापमानाचा पारा अजून काहीसा वाढेल. विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट काही प्रमाणात राहणार असल्याने पुन्हा अवकाळी पावसासाठी पोषक वातावरण तयार होण्याचे संकेत आहेत.
सोमवारी (ता. ५) सकाळी चोवीस तासांत अकोला येथे उच्चांकी ४२.१ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले. कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही वाढ होत आहे. महाबळेश्वर येथे १७.० अंश सेल्सिअसची सर्वात कमी किमान तापमान नोंदविले गेले. अंदमान समुद्राच्या उत्तर भाग आणि म्यानमारच्या किनारपट्टीदरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती सक्रिय होत आहे. ही स्थिती समुद्रसपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आहे. तर उत्तर कर्नाटक ते तमिळनाडूच्या उत्तर -दक्षिण दरम्यान कमी दाबाचा पट्टा असून तेलंगाणा ते उत्तर तमिळनाडू या दरम्यान चक्रीय वाऱ्यांची स्थिती तयार होत आहे. याचा परिणाम राज्यातील वातावरणावर होत असल्याने उन्हाचा चटका, वाढता उकाडा, उष्णतेची लाट आणि अवकाळी पाऊस असे वातावरणात बदल होत
आहेत.
यामुळे विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मराठवाड्याच्या काही भागात व कोकण गोव्याच्या तुरळक भागात किंचित वाढ झाली आहे. मध्य महाराष्ट्राच्या तुरळक भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.
[ad_2]
Source link
आम्ही कास्तकार.इन वरील ही पोस्ट आवडल्यास शेयर नक्की करा. दररोज अपडेटेड राहण्यासाठी आपल्या टेलिग्राम ग्रुपला आणि टेलिग्राम चॅनलला अवश्य जॉईन व्हा.
ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन यासाठी आम्ही कास्तकार.कॉम या वेबसाईटला तसेच युट्युब चॅनलला सबस्क्राईब करा.