[ad_1]
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता. सावंतवाडी) येथील शेतकरी श्रीराम अकुंश सावंत यांच्या बागेतील अडीचशे केळींचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. विक्रीयोग्य झालेल्या केळींचे नुकसान गव्यांकडून सुरू असल्यामुळे या परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत.
विलवडे, बांदा, या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी लागवड आहे. अनेक शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणूनच केळीची लागवड केलेली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून गव्यांकडून या पिकाला सतत उपद्रव होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. विलवडे मळावाडी येथील शेतकरी श्रीराम सावंत यांची केळीची बाग आहे. सध्या या बागेतील केळी विक्रीयोग्य झाली आहे. परंतु मंगळवारी रात्री उशिरा गव्यांच्या कळपाने श्री. सावंत यांच्या बागेतील अडीचशे केळींचे नुकसान केले. त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
बुधवारी सकाळी शेतकरी बागेत गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. हातातोडांशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे त्यांना धक्काच बसला. या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी वनविभाग आणि कृषी विभागाला नुकसानीची माहिती दिली आहे. या भागात गव्याचा उपद्रव वाढला आहे. भरदिवसा बागांमध्ये घुसून शेतीचे नुकसान करीत आहेत.
शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
बांदा गडगेवाडी येथील शेतकरी सदाशिव सावंत हे गुरे चारण्यासाठी गेले होते. ते परतत असताना रस्त्यालगत असलेल्या दोन गव्यांनी त्यांचा पाठलाग केला. श्री. सावंत यांनी तत्काळ एका झाडाचा आधार घेतला. त्यामुळे ते बचावले. भरदिवसा गव्यांनी पाठलाग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पालेभाज्यांसह विविध शेती केली जाते. मात्र गव्यांकडून सातत्याने नुकसान केले जात आहे. त्यामुळे वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यातील विलवडे मळावाडी (ता. सावंतवाडी) येथील शेतकरी श्रीराम अकुंश सावंत यांच्या बागेतील अडीचशे केळींचे गव्यांच्या कळपाने नुकसान केले. विक्रीयोग्य झालेल्या केळींचे नुकसान गव्यांकडून सुरू असल्यामुळे या परिसरातील शेतकरी हैराण झाले आहेत.
विलवडे, बांदा, या परिसरात मोठ्या प्रमाणात केळी लागवड आहे. अनेक शेतकऱ्यांनी मुख्य पीक म्हणूनच केळीची लागवड केलेली आहे. परंतु गेल्या काही महिन्यांपासून गव्यांकडून या पिकाला सतत उपद्रव होत असल्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. विलवडे मळावाडी येथील शेतकरी श्रीराम सावंत यांची केळीची बाग आहे. सध्या या बागेतील केळी विक्रीयोग्य झाली आहे. परंतु मंगळवारी रात्री उशिरा गव्यांच्या कळपाने श्री. सावंत यांच्या बागेतील अडीचशे केळींचे नुकसान केले. त्यांचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले.
बुधवारी सकाळी शेतकरी बागेत गेल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. हातातोडांशी आलेल्या पिकाचे नुकसान झाल्यामुळे त्यांना धक्काच बसला. या पिकाच्या नुकसानीचा पंचनामा करण्यासाठी त्यांनी वनविभाग आणि कृषी विभागाला नुकसानीची माहिती दिली आहे. या भागात गव्याचा उपद्रव वाढला आहे. भरदिवसा बागांमध्ये घुसून शेतीचे नुकसान करीत आहेत.
शेतकऱ्यावर हल्ल्याचा प्रयत्न
बांदा गडगेवाडी येथील शेतकरी सदाशिव सावंत हे गुरे चारण्यासाठी गेले होते. ते परतत असताना रस्त्यालगत असलेल्या दोन गव्यांनी त्यांचा पाठलाग केला. श्री. सावंत यांनी तत्काळ एका झाडाचा आधार घेतला. त्यामुळे ते बचावले. भरदिवसा गव्यांनी पाठलाग केल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या परिसरात पालेभाज्यांसह विविध शेती केली जाते. मात्र गव्यांकडून सातत्याने नुकसान केले जात आहे. त्यामुळे वनविभागाने गव्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
[ad_2]
Source link